Tuesday, September 30, 2008

दहशतवाद : मुस्लिम आणि सतर्कता

आझमगड आणि मुजफ्फरपूर हे उत्तरप्रदेशातील दोन जिल्हे आयएसआयच्या रडारवर आहेत. तसेच वाराणसी, सहारणपूर, कानपूर जिल्ह्यांमध्ये सिमीने मोठ्या प्रमाणावर जाळे पसरवले असून आझमगडमध्ये देशी पिस्तुले, बंदुका, कट्टे निर्मितीचे बेकायदेशीर कारखाने आहेत. कुविख्यात अबू सालेम आझमगडमधला आहे. दिल्लीत 13 सप्टेंबरला झालेल्या 4 भीषण बॉम्बस्फोटांत 20 ठार तर 100 हून अधिक जखमी झाले. या बॉम्बस्फोटातील पाचही सूत्रधार आझमगडचेच आहेत. नुकतेच मुंबई पोलिसांनी पकडलेले अफजल मुतालिख उस्मानी, मोहम्मद सादिक शेख, मोहम्मद अरिफ शेख, मो. झकीर शेख, मो. अन्सार शेख या सर्वांचा आझमगडशी संबंध आहे. सादिक शेख हा इंडियन मुजाहिद्दीनचा एक संस्थापक आहे. 2000 पासून घडलेल्या 54 मोठ्या घटनांपैकी 45 घटनांमधील दहशतवादी हे उत्तर प्रदेशशी संबंधित आहेत. 93च्या मुंंबई बॉम्बस्फोटाचे सूत्रधार करीम तुंडा, अझीम अहंमद हे प्रतापगड जिल्ह्यातील आहेत. लाल किल्ल्यावर हल्ला चढवणारे लष्कर-ए-तोयबाचे 2 अतिरेकी मारले गेले. ते सुद्धा फैजाबादचे होते. 25 सप्टेंबर 2002 रोजी अक्षरधाम मंदिरावर हल्ला चढवणाऱ्यांना शस्त्रसाठा पुरवला बरेलीच्या चांद खानने तर 29 जुलै 2003 रोजी मुंबईतील घाटकोपर येथे बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी पैसे व शस्त्रसाठा पुरवला कानपूरच्या शकील अहमदने. 13 मे 2008 रोजी जयपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे लखनौच्या शाबाज हुसैन व मथुराच्या हकिनुद्दिनचा हात होता. 25 जुलै अहमदाबादमधील बॉम्बस्फोटाचा सूत्रधार अबू बशीर हा सुद्धा आझमगडचा. सराईमीर येथील मदरशातील अबू बशीर हा विद्यार्थी. आझमगडमध्ये जवळपास 250 मदरशे आहेत. मात्र असे असतानाही राज्य सरकार व केंद्र सरकार कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. आईच्या निधनानंतर अबू सालेम आझमगडला आला असताना दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी लोकांनी रस्त्यावर उतरून खाकी वर्दीच्या गराड्यातून अबूला बाहेर काढण्याचे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. तर दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर मुस्लिमांना त्रास होता कामा नये असे मुख्यमंत्री मायावती यांनी पोलीस खात्याला बजावले होते. दहशतवाद्यांना शिक्षा द्या, पण आझमगडची बदनामी करू नका असा ढोल शबाना आझमी यांनी बडवला, आजवर झालेल्या सर्व बांग्लादेशींना भारताचे नागरिकत्त्व द्यावे अशी मागणी करण्यापर्यंतची मजल राम विलास पासवान यांची गेली. तर मुंबईतील राज ठाकरे यांच्या आंदोलनाला विरोध करताना आझमगडहून 20 हजार लोक मुंबईत आणू अशी धमकी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खा. अबू आझमी यांनी दिली होती.या संपूर्ण घटनांचा आणि नावांचा विचार केल्यास उत्तर प्रदेशातून (विशेषत: मुस्लिम) मुंबईत येणाऱ्यांपैकी बरेच जण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी खिळखिळी करण्यासाठीच येत असल्याचे निष्पन्न होते. त्यामुळे या लोकांशी मुंबईकरांनी कसे वागायचे आणि त्यांना कसे वागवायचे याचा निर्णय सतर्कपणे घेतलाच पाहिजे.
मुंबईच्या कोणत्याही भागात गेलो तरी कोणी कोणाला ओळखत नाही, कोणी हटकत नाही. त्यामुळे बिहार उत्तर प्रदेशातील अनेक तडीपार गुंडांनी मुंबईत आश्रय घेतला आहे. त्यांच्या आश्रयाने आजही अनेकजण मुंबईत बिनबोभाटपणे येतच आहेत. मुंबईच्या निरनिराळ्या भागात राहत आहेत आणि देशद्रोही कामे बिनधास्तपणे करीत आहेत. गेल्या काही वर्षांतील देशभरातील हिंसाचारात पकडलेले बहुतेकजण मुस्लिम समाजातील तरुण आहेत. अनेक मुसलमान या देशाशी एकनिष्ठ असले तरी त्यांचे काही धर्मगुरु व नेते मंडळी स्वत:चे स्थान व वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांच्याच मुस्लिम तरुणांना सतत भडकवत असतात. खोटे-नाटे सांगून त्यांची दिशाभूल करतात, आपला समाज अशिक्षित व गरीबी, दारिद्रयात खितपत पडावा यासाठी प्रयत्नशील असतात. विविध कारणांनी मुस्लिम तरुणांची माथी भडकावून त्यांना हिंसाचार करण्यास भाग पाडायचे, वरून आमच्या धर्माचा हिंसाचारावर विश्वासच नाही, त्यामुळे मुसलमानांच्या हातून कधी हिंसाचार होणारच नाही अशा आरोळ्या ठोकायच्या. या आरोळ्या ठोकणारे वर उल्लेख केलेल्या सर्व घटनांमधील गुन्हेगार, आरोपी हे मुसलमानच आहेत, त्याचबरोबर खुद्द पाकिस्तानातील कराची येथील मेरिएट पंचरातांकित हॉटेल कोणी उडवले, त्यातील स्फोटात 100 माणसे मारली गेली, त्याला जबाबदार कोण, या प्रश्नांची उत्तरे देतील काय? देशभरातील प्रमुख शहरांमधून "सिमी, इंडियन मुजाहिद्दीन व लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी इस्लामिक संघटना बॉम्बस्फोट घडवून त्याची जबाबदारीही जाहिररित्या स्वीकारत आहेत. शंभर कडव्या इस्लामी तरुणांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण "तौकिरने' दिले. हेच तरुण आता देशभरात धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे या दहशतवादी संघटना व आरोपी, गुन्हेगारांचा देशातील इस्लामिक संघटनांनीच जाहीर निषेध नोंदवून त्यांचा विरोध करायला हवा. देशातील सर्व मुस्लिम संघटनांनी एकत्र येऊन दहशतवाद्यांना उधळून लावण्यासाठी पोलिसांना सहाय्य केल्यास या दहशतवादावर नक्कीच अंकूश बसेल. आतापर्यंत पकडलेले सर्व दहशतवादी मुसलमान असल्याने राष्ट्रप्रेमी मुसलमानांनी कुठल्याही देशद्रोही शक्तींना थारा न देता त्यांची मिळालेली माहिती पोलिसांना द्यायला हवी.
त्याचबरोबर चीन, पाकिस्तान आणि बांग्लादेशाकडून देशाला धोका आहे. देशात सध्या सुमारे 5 कोटी घुसखोर रहात असून दररोज सुमारे 6 हजार घुसखोर भारतात प्रवेश करतात. असाममधील 11, पं. बंगालमधील 9, बिहारमधील 6 आणि झारखंडामधील3 जिल्हे बांग्लादेशीय घुसखोरांमुळे मुस्लिमबहुल झाले आहेत. बिहारमधील पसरलेल्या भीषण पुरसदृष्य परिस्थितीनंतर तेथील पुरग्रस्तांसह घुसखोर मुंबईत दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर येतही आहेत. परंतु विविध कारणास्तव, उत्सव, बंदोबस्तासाठी गुंतलेल्या पोलिसांना त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही. भारत-पाकिस्तान, भारत-बांग्लादेश सीमेवर दहशतवाद्यांचे शेकडो प्रशिक्षण कॅम्पस आहेत. या कॅम्पसमधून प्रशिक्षण घेतलेले भारतात खुलेआम घुसखोरी करीत आहेत. या घुसखोरांच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे, खोट्या नोटा, मादक पदार्थांची तस्करी चालू आहे. त्यामुळे आतंकवाद, घुसखोरी, दहशतवाद संपवायचा असेल तर मुस्लिम संघटनांनीच पुढे येण्याची आज खरी गरज आहे. त्याचबरोबर दहशतवादाला आळा घालणे हे केवळ पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणेचेच काम आहे, असे नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने त्या दृष्टीने सावध राहणे आवश्यक आहे. मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट पोलिसांनी 5 दहशतवाद्यांना पकडून उधळून लावला. या 5 अतिरेक्यांना अटक केल्यामुळे मुंबईवरचे संकट तात्पुरते टळेल असले तरीही गाफील राहून चालणार नाही. मुंबई शहर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या धमाक्यावर उभी आहे. हा धमाका कोणत्याही क्षणी व कोठेही होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क रहाणे अत्यावश्यक आहे.

No comments: