Wednesday, January 12, 2011

क्रिकेट वाटोळे करणारा खेळ

क्रिकेट हा मानवी तास वाया घालविणारा राष्ट्रविघातक खेळ आहे. हे जगातील प्रगत राष्ट्रांनी ओळखले आहे. म्हणून ते क्रिकेटपासून अलग आहेत. क्रिकेट बघणाऱ्या भारतीयांचा दरवर्षी क्रिकेट बघण्यात जो वेळ वाया जातो, तो त्यांनी काम करण्यात खर्च केल्यास हजारो कोटींची राष्ट्रीय संपत्ती निर्माण होऊ शकेल. जगातील प्रगत देश स्वत: क्रिकेट खेळत नाहीत; पण त्यांच्या कंपन्या मात्र भारतासारख्या देशांना क्रिकेट खेळवतात. आमचा देश मॅच जिंकला, की आम्ही फटाके फोडतो. आमचा राष्ट्राभिमान उतू जातो. खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होतो; पण ते खेळाडू पेपसी, कोकाकोला वगैरे विदेशी कंपन्यांच्या विषारी मालांची जाहिरात करून राष्ट्रद्रोह करतात.
भारतासारखे क्रिकेटवेड युरोप-अमेरिकेत नाही. क्रिकेटचे माहेरघर असलेल्या लंडन शहरातही गल्लीबोळात कुठेही क्रिकेट दिसत नाही. साधारणपणे 16 व्या शतकात इंग्लंडमध्ये क्रिकेटची सुरुवात झाली. इ. स. 1987 साली मेरिलीबोन क्रिकेट क्लबची (एमसीसी) स्थापना झाली. जगात जिथे जिथे ब्रिटिशांच्या वसाहती स्थापन झाल्यात, तिथे तिथे ब्रिटिश सैनिक, अधिकारी क्रिकेट खेळू लागले. ऑस्टे्रेलियात स्थायिक झालेल्या इंग्रजांनी 19 व्या शतकाच्या प्रारंभापासून तिथे क्रिकेटची सुरुवात केली. त्याच काळात न्यूझीलंडमध्येही क्रिकेट खेळले जाऊ लागले. सुरुवातीचे क्रिकेट सामने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोनच देशात होत असत. असा पहिला सामना 1877 साली ऑस्टे्रलियात झाला. 19 व्या शतकाच्या प्रारंभी इंग्रजांबरोबर क्रिकेटही भारतात आले. भारताचा पहिला कसोटी सामना 1932 साली भारत विरुध्द इग्लंड असा लंडन येथे झाला. यावेळी भारत इंग्रजांचा गुलाम देश होता. काळानुरूप स्वरूपही बदलत गेले.
एकदिवसीय जागतिक क्रिकेट सामने 1975 साली सुरू झाले. यावेळी इंग्लंड, ऑस्टे्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, पूर्व आप्रिच्का, भारत, पाकिस्तान व श्रीलंका या आठ देशांच्या संघांनी भाग घेतला. अमेरिका (यूएसए) हा इंग्रजांची गुलामगिरी झुगारून देणारा पहिला देश होय. अमेरिकेत क्रिकेट नाही. वास्तविक अमेरिकेत इंग्लंडमधून आलेल्यांचे वंशज बहुसंख्येने आहेत, तरीही तिथे क्रिकेट नाही.
क्रिकेट खेळणारे देश आणि त्यांची लोकसंख्या
1) भारत- 118 कोटी 46 लक्ष 2) पाकिस्तान 17 कोटी 2 लक्ष 3) बांगलादेश 16 कोटी 44 लक्ष यूके (इंग्लंड) 6 कोटी 20 लक्ष 5) दक्षिण आप्रिच्का 5 कोटी, 6) ऑस्टे्रलिया 2 कोटी 24 लक्ष 7) श्रीलंका 2 कोटी 4लक्ष 8) झिम्बाब्बे 1 कोटी 26 लक्ष 9) डॉमिनिकन रिपब्लिक (वेस्ट इंडिज) 1 कोटी 2 लक्ष 10) न्यूझिलंड 43 लक्ष एकूण 170 कोटी 31 लक्ष क्रिकेट लोकसंख्येतून भारताची लोकसंख्या वजा केल्यास बाकीच्या सर्व देशांची मिळून 51 कोटी 83 लक्ष लोकसंख्या राहते. (म्हणजे भारताच्या अर्ध्या लोकसंख्येपेक्षाही कमी) त्यातही पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे एकेकाळी भारताचेच भाग असलेल्या देशांची 35 कोटी 50 लक्ष लोकसख्ंया अलग केल्यास, फत्तच् 16 कोटी 33 लक्ष उरतात. (म्हणजे जवळपास महाराष्ट्राच्या दीडपट) न्यूझीलंडची लोकसंख्या तर मुंबईच्याही अर्धी नाही.
विश्वविजेता, विश्वविक्रम म्हणणे अज्ञानप्रदर्शक
विश्वात पृथ्वी एखाद्या अंडयाएवढी आहे. अशा पृथ्वीवरील 223 देशांपैकी फत्तच् 10-12 देशांत क्रिकेट खेळतात. पृथ्वीवरील 600 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येपैकी भारत, पाक, बांगला देश आणि सिलोन वगळल्यास फत्तच् 16 कोटी 33 लक्ष लोकसंख्या क्रिकेटवाल्या देशांची आहे. जगातील 223 देशांपैकी 210 देशात क्रिकेटला स्थान नाही. भारतातही 70 टक्के लोकांना क्रिकेट कळत नाही. बघतही नाहीत. मग अशा चिमूटभर भागात मिळालेल्या विजयाला विश्वविजय विश्वविक्रम असे संबोधून त्यांचा उदोउदो करणे हे 'शुध्द' (किंवा बेशुध्द') मूर्खपणाचे लक्षण नव्हे काय? भारतातही आंतरराष्ट्रीय सामन्यातील खेळाडूंची निवड मुंबईसारख्या मोठया शहरातूनच होते. त्यांची गुणवत्ता म्हणजे भारतीयांची गुणवत्ता ठरू नये. कारण एकतर हा खेळ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे आणि सर्वसामान्यांना योग्य प्रशिक्षण उपलब्ध नसते. शिवाय सामान्य गुणवंत योजनाबध्दषरत्या डावलण्यात येतात.
दिल्लीला राष्ट्रकुल स्पर्धेत कविता राऊत सारख्या गरीब आणि मागासलेल्या वर्गातील मुलीने 10 हजार मीटर दौडीत मिळविलेले कांस्यपदक ग्रामीण गरिबांतही कसदार आणि काटक क्रीडा गुणवत्ता असते हे यावरून सिध्द होते. अशांचा शोध घेऊन त्यांना संधी दिल्यास क्रिकेटमधील अनेकांची मत्तेच्दारी आणि तथाकथित विश्वविक्रम मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाही. क्रिकेटला ऑलिम्पिक किंवा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये स्थान नाही, हॉकीला आहे. पूर्वी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला एकुलते एक सुवर्णपदक मिळत असे ते फत्तच् हॉकीत. भारताला मिळाले नाही, तर पाकिस्तानला मिळायचे; पण जेव्हा इतर देशानींही हॉकीतील कौशल्य अवगत केले तेव्हा आता भारत किंवा पाकला पात्र फेरीसुध्द गाठणे कठीण जाते. इतर देश खेळले तर क्रिकेटचीही हीच अवस्था होईल. आज मात्र 'वासरात लंगडया गाई शहाण्या' (विश्चविजेत्या) ठरत आहेत; पण जगातील प्रगत देश क्रिकेट खेळणार नाहीत. काम-धाम सोडून तासनतास बसून क्रिकेट बघणारा प्रेक्षक फत्तच् भारतातच आहे. इंग्लंड व इतर देशातील क्रिकेट सामन्यातही तेथील भारतीयांचीच अधिक गर्दी असते.
क्रिकेट हा मानवी तास वाया घालविणारा राष्ट्रविघातक खेळ आहे. हे जगातील प्रगत राष्ट्रांनी ओळखले आहे. म्हणून ते क्रिकेटपासून अलग आहेत. क्रिकेट बघणाऱ्या भारतीयांचा दरवर्षी क्रिकेट बघण्यात जो वेळ वाया जातो, तो त्यांनी काम करण्यात खर्च केल्यास हजारो कोटींची राष्ट्रीय संपत्ती निर्माण होऊ शकेल. जगातील प्रगत देश स्वत: क्रिकेट खेळत नाहीत; पण त्यांच्या कंपन्या मात्र भारतासारख्या देशांना क्रिकेट खेळवतात. आमचा देश मॅच जिंकला, की आम्ही फटाके फोडतो. आमचा राष्ट्राभिमान उतू जातो. खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होतो; पण ते खेळाडू पेपसी, कोकाकोला वगैरे विदेशी कंपन्यांच्या विषारी मालांची जाहिरात करून राष्ट्रद्रोह करतात. 'लगान' नावाचा सिनेमा बघून क्रिकेटवेड खेडोपाडी पोचत आहे. तो लगानचा 'राष्ट्रभत्तच्' हिरो मात्र 'थंडा मतलब' सांगून आपली ओळख देत आहे.
सारांश भारतातील सर्वसामान्यांतील कर्तबगार, बुध्दिमान आणि हुशार तरुणांना बिघडविणारा, त्यांच्या जीवनाचे वाटोळे करणारा हा खेळ आहे. लॉटरीसारखे ते क्रिकेटच्या मागे धावत आहेत. लॉटरीमुळे एखादाच करोडपती बनतो; पण करोडो मात्र लॉटरीत पैसा लावून बुडतात.

2 comments:

हेरंब said...

फारच एकांगी लेख. अमेरिका किंवा अन्य प्रगत देश क्रिकेट खेळत नसले तरी ते इतर खेळ खेळतातच. त्यासाठी तासनतास टीव्हीला चिकटून बसतात. अमेरिकेतल्या NFL, NBA, Baseball इ इ खेळांविषयी आपल्याला काही माहिती आहे का? एकदा 'NFL SuperBowl' असं गुगलून बघा. बरेच गैरसमज दूर होतील.

देववाणि! said...

he kharokhar satya ahe mi ya matashi sahmat ahe