Friday, July 2, 2010

स्वातंत्र्योत्तर काळात देशाला मिळाले भ्रष्ट नेते!

सध्याच्या संयुक्त पुरोगामी आघाडीत खूनाचे, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते आता केंद्रात स्थानापन्न झालेत. आरोप असलेल्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात येत आहे. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना देशाला अर्पण केली. या घटनेला 63 वर्षे झाली आहेत. या घटनेमुळे देश आतापर्यंत एकसंघ राहिला असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही. मात्र आता या खंडप्राय देशाच्या एकात्मतेला तडे देण्याचे काम आजच्या नेत्यांकडूनच सुरू आहेत. धर्म, जात, पंथ, भाषा, जन्मस्थानावरून वाद निर्माण केला जातोय. यातूनच देशाच्या घटनेला आव्हान देण्याचा प्रयत्नही काही पुढाऱ्यांकडूनच केला जातोय. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय नेतृत्व कमकुवत झाले तेव्हा तेव्हा या शक्तींनी तोंड वर काढले. आज हाच धोका भारताला आहे. एक काळ असा होता की, देशभक्तीने झपाटलेले अनेक नेते होते. मात्र देशभक्त म्हणून आज कोणत्या नेत्याकडे बोट दाखवावं हा एक प्रश्नच समोर असतो. एकूण आजची राजकीय स्थिती यावर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी या स्थितीबद्दल अत्यंत विदारक सत्य लिहून ठेवले आहे. इलेक्शन्स अँड देअर करप्शन्स, इनजस्टीस अँड दी टिरनी ऑफ वेल्थ अँड इनइफीशियन्ट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन विल मेक ए हेल ऑफ लाईफ ऍज सून ऍज फ्रिडम इज गिव्हन टू अस... होप लाईज ओन्ली इन युनिव्हर्सियल एज्युकेशनबाय विच राईट कन्डक्ट, फिअर ऑफ गॉड अँड लव्ह विल बी डेव्हलप अमंग दी सिटीझन्स फ्रॉम चाईल्डहूड....अदरवाईज इट विल मिन दी ग्राईंडिंग इनजस्टीस अँड टिरनी ऑफ वेल्थ. राजगोपालाचारी यांनी हे विधान स्वातत्र्यांच्या 25 वर्षाअगोदर केले होते. कारागृहात असताना त्यांनी ही नोंद रोजनिशीमध्ये लिहून ठेवली होती. 90 वर्षानंतर हे विदारक सत्य आपल्या देशाच्या राजकीय पक्षांच्या व त्यांच्या निवडणुकीचे भयावह रूप दर्शवते. ज्या तऱ्हेने आज राजकीय पुढारी वागत आहेत त्याच्यावरून वाटत नाही की, देशाची लोकशाही त्यांच्या हातात सुरक्षित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी स्वातंत्र्य सेनानी, देशभक्त पाहिले आहेत. ज्यांच्या कर्तृत्वाने हिमालयानेही नतमस्तक व्हावे. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळी देशाचे नेतृत्व कुणी करावे हा प्रश्न उपस्थित झालाच नाही. किंवा या देशाची घटना कोणी लिहावी हा विचारही करावा लागला नाही. कारण पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे नेतृत्व आपल्याकडे होते. स्वातंत्र्यानंतर 1964 पर्यंत पंडित नेहरू यांचे जगमान्य नेतृत्व देशाला लाभले. नेहरूंच्या मृत्यूनंतर देशाला लालबहादूर शास्त्री यांच्या रूपाने एक खंबीर नेतृत्व मिळाले. दुर्दैवाने ते फार काळ लाभले नाही. त्यानंतर इंदिरा गांधी हे नाव समोर आले. मात्र त्यांच्या विरोधात विविध समाजवादी नेतेमंडळी होती. मात्र बांगलादेशाच्या युध्दापर्यंत इंदिरा गांधी यांचे नेतृत्वही देशमान्य झाले नव्हते. ते बांगला देशाच्या युध्दात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर इंदिरा गांधी यांचे नेतृत्व जनतेने स्वीकारले. 1970 च्या गुजरातमध्ये आरक्षणाच्या मुद्दयावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले. त्याचवेळी बिहारमध्ये इंदिरा गांधी यांना विरोध झाला. पंजाब व बिहारचा वादामुळे इंदिराजींना आपले प्राण गमवावे लागले. धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना भडकवणं हे खुर्ची मिळविण्याचं राजकारण ठरलं. त्यानंतर आलेले राजीव गांधी यांचा राजकारणात प्रवेश झाला परंतु विश्वासघात होवून ज्या वेगाने आले त्याच वेगाने त्यांची बदनामी झाली. 1989 मध्ये व्ही.पी.सिंग पंतप्रधान झाले. आणि उत्तरप्रदेश व बिहारमध्ये यादवांचे प्रस्थ वाढले. ही सर्व मंडळी केवळ सत्तेसाठी व पैसा जमविण्यासाठी एकत्र आली. सत्ता मिळविण्यासाठी जाती धर्माचा उपयोग करायचा व सत्ता टिकविण्यासाठी पैसा ओतायचा, हा राजकारणात टिकून राहाण्याचा एक नवा सिध्दांत मांडला गेला. आजही देशापुढे सशक्त नेतृत्व उभे न राहिल्याने हा प्रश्न भेडसावत आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला मर्यादा असून त्यांना पंतप्रधानपदामध्ये रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी यात किती तथ्य आहे हे त्यांच्या आजच्या राजकारणातल्या ढवळाढवळीवरून दिसतंच आहे. त्यामुळे आज एकच नमूद करावंस वाटतं की, भारतीय जनता देशाला जाती पंथापेक्षा जास्त प्राधान्य देणार की, जाती पंथाला देशापेक्षा उंच जागेवर ठेवणार हे जनतेने ठरवायचे आहे. जनतेने हेे ठरवलेच असले तरी देशाचे सत्ताधारी हे गुंडधारी आहेत. त्यामुळे ते जनतेच्या सुखापेक्षा स्वत:च्या सुखाचा विचार करणारे हे नेते स्वहिताचाच विचार करणारे आहेत.

No comments: