Friday, June 25, 2010

प्रेम भावनांचा खेळ!

प्रेम तसा भावनांचा खेळ! या खेळात प्रत्येकजण सहभागी होतो. आणि खेळ म्हटलं की हार-जीत आलीच. ती स्वीकारण्याची तयारी मात्र हवी. प्रेमाच्या या संवेदनशील भूमिकेत तुमचा अभिनय हा वाखणण्याजोगा असावा. प्रेम या शब्दाला लाजवेल अशी भूमिका तुमच्याकडून पार पाडली जावू नये. अर्थात हार पत्करण्याची वेळ आली तरी तुम्ही त्या जिंकणाऱ्याच्या वाट्यात तितकेच सहभागी असता. परंतु अशी हार पत्करण्याची त्यागी भावना प्रत्येकातचं असते असं नाही. मानवी जीवनात जन्मापासून तर अन्तापर्यंत एक निर्भेळ भावना जीवंत असते, ती म्हणजे कुणीतरी आपल्यावर जीवापाड प्रेम करावं, आपलं दु:ख, यातना, वेदना आपण ज्याच्यासमोर मनमोकळेपणाने सांगू शकू अशी एकतरी व्यकनती आपल्याजवळ असावी. ही आंतरिक भावना प्रत्येकाच्या मनात सदैव असते. आपणही कुणावर तर प्रेम करावं ही भावना सुध्दा त्याचवेळी जन्म घेत असते. मग प्रत्येकाच्या जीवनात ही सुगंधी प्रेमाची दरवळ निर्माण होतेच, असं नसते. परंतु प्रत्येक जीव या आशेसह जीवन जगत असतो. हे मात्र खरे.
अशा असंख्य अशा, आकांक्षांसह चालताना त्या आशेची पूर्तता होईल याचाही भरवशा नसतो. कारण मानवी जीवनात नियतीनं ठरवून दिलेलनया रस्त्यावरून जाताना प्रत्येकाला एकदा तरी ठेच लागलेली असतेच. म्हणूनच नियतीचं जे घडवलंय त्याचा स्वीकार करून जीवन जगण्याचंा प्रयत्न करावा.
खरं तर प्रेमाची व्यात्पी ही फक्त प्रियकर व प्रेयसी या दोघांपुरतीच मर्यादीत नसून ती एक वैश्विक संकल्पना आहे. पण आम्ही आई-वडिल, भाऊ, बहिण, या नात्यांपेक्षा या नात्याला अधिक जवळ केलंय. वीस वर्ष आईच्या कुशीत विसावणाऱ्या या पाखराला उडण्याचं सामर्थ्य निर्माण झाल्यावर ते कधी भरकटत ते त्यालाही त्याचं कळत नसावं. ते वयंच तसं नसतं तर मनानं घेतलेली भरारी असते ती. हे नातं खुप सुंदर असतं. पण ते सुंदररितीने जगताही यायला हवं. कारण या वयात भरकटत जाणारी विचलीत मनांची अवस्था जिणं मुश्किल करते. प्रेमात तुम्ही नेहमीच विजयी व्हालच असं नाही. तुम्हाला हारही पत्करावी लागेल. कारण जीवनाच्या या खडतर प्रवासात तुमच अवस्था समुद्रप्रवासात असणाऱ्या दिशाहीन जहाजासारखी असते. हे जहाजाला दीशा देण्याचं महत्वाचं काम तुम्हाला पार पाडायचं असतं. अन्यथा दिशाहीन होण्याची भिती अधिक असेल. प्रेम करणं हे पाप नाही. पण यात जबरदस्ती, आसक्ती असू नये. हे दोन मनाचं मिलन आहे. अशा या प्रेमाची पवित्रता प्रत्येकाने जपावी.नाहीतर जीवन हे जगणं खरच मुश्किल होवून जाईल. आज प्रत्येकाचे जीवन जगण्याचे संदर्भ बदलले असले तरी प्रेमाचं पावित्र्य जिथं जोपासल जातं तिथं जीवन हे सुखानं जगणं अगदी सोपं होवून जातं.

No comments: