Wednesday, June 23, 2010

अपयशातून मिळणारं यश अधिक समाधानकारक

अपयश ही यशाची पहिली पायरी होय. अपयश म्हणजे आपल्यातील उणिवा ओळखण्यासाठी आलेली संधी; त्याचप्रमाणे आपल्या चुका सुधारण्याची संधी असते. परीक्षेत अपयश आल्याने अथवा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने अनेक विद्याथ्र्यांमध्ये नैराश्य निर्माण होते. काहीवेळा या नैराश्येच्या पोटी विद्यार्थी आत्तहत्याही करतात. आजकाल अशा प्रकारच्या घटना होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामागची कारणे आणि उपाय या संबंधी विचार होणे आवश्यक आहे.
अपयश आल्यानंतर सारं काही व्यर्थच आहे असा नकारात्मक विचार नैराश्यमागील प्रमुख कारण असलं तरी अशा नकारात्मक विचार वाढीस अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आज आपल्याकडे परीक्षांना अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे. यामागे पालकांची मानसिकता महत्वाची असते. कारण यांच्या मत आपल्या मुलाने केवळ परीक्षा निव्वळ पास होणे एवढेच यांच्यासाठी महत्वाचे नसते तर त्याने अधिकाधिक गुण मिळवणं महत्वाचं असतं. त्यांनी ही मानसिकता जपणं गैर नाही. कारण आज उत्तम गुण म्हणजे उत्तम नोकरी, व्यवसाय, मग पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा असे एक समीकरणच तयार झाले आहे. त्यातच पाल्याच्या क्षमतेचा, कुवतीच्या विचार मात्र पालकांकडून केला जात नाही. उलट अनेक खासगी क्लासेस, टेस्ट सिरीज, पुस्तके यांचा भडीमार केला जातो. त्यामुळे त्याची होणारी शारीरिक मानसिक ओढाताण याकडे फारसे लक्ष न देता परीक्षेत उत्तम गुण मिळविणे आवश्यक आहे हेच त्यांच्या मनावर बिंबवले जाते.
पालक नेहमीच आपल्या पाल्याला हे वर्ष तुझ्यासाठी किती महत्वाचे आहे हे कायम मनावर ठसवण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात पालक आपली समाजात प्रतिष्ठा जपण्यासाठी हे सारं करत असले तरी शेवटी पाल्याचं यश हे त्याच्या सुखी आयुष्याची तिजोरी असते. ती भरण्याचाच पालकांकडून प्रयत्न होत असतो. पण ती भरताना आपण कोणता मार्ग अवलंबतोय याचाही विचार करणं गरजेचं आहे. बèयाचवेळा मार्ग चुकतात आणि मग यशाऐवजी अपयश पदरात पडतं. हे अपयश पचवणं पालकांना सहज शक्य नसतं आणि मग मुलांमध्ये नैराश्य येतं. यासाठी सामाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कारण पाल्यास पालकांची, समाजाची भिती असते. ही भिती काढून पालक व पाल्य यांच्यातील संबंध अधिक मोकळे होणे, गरजेचे आहे.
शैक्षणिक यश अपयश आणि जीवनातील यश अपयश यामध्ये फरक आहे. तुमचे अपयशच तुम्हाला यशाचा मार्ग दाखवेल. कारण अपयश म्हणजे आपल्यातील कमतरता ओळखण्यासाठी आलेली संधी. अपयशातून मिळालेल्या यशानं ज्यांच्या पायाजवळ लोळण घेतलंय अशा अनेक व्यक्ती आपल्याकडे होवून गेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे माऊंट एव्हरेस्ट सर करणारे एडमंड हिलरी. परंतु या शिखरावर चढताना अनेकवेळा अपयश आलेल्या एडमंड हिलरी यांनी हिमालयाच्या शिखराला उद्देशून म्हटले होते, तू माझा पराभव केलास, मी पुन्हा येईन व तुझ्यावर विजय मिळवेने. आणि अपयशातून मिळालेले हे यश अधिक समाधानकारक होते.

No comments: